⏹️ पावसाळ्यात घ्यायची काळजी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/8/2026 :
तुळस, हळद आणि आले यांचा काढा आयुर्वेदात एक शक्तिशाली नैसर्गिक पेय मानला जातो. या तिघांच्या संयोजनातून मिळणारे फायदे शरीर, मन आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
*तुळस+हळद+आले काढा पिण्याचे फायदे*
*१)* रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तुळस शरीराला बळकटी देते. हळद शरीरातील सूज व विषारी घटक कमी करते. आले संक्रमणांपासून संरक्षण करते.
*२)* या काढ्यामुळे छातीत जमा झालेला कफ वितळतो. घसा खवखवणे आणि गळ्याचे इन्फेक्शन कमी होते. विषाणूजन्य तापात उपयोगी.
*३)* आले आणि हळद पचनास चालना देतात. गॅस, अपचन, पोटदुखी यावर फायदेशीर. चहा ऐवजी हा काढा पिल्यास पचन क्रिया सुधारते
*४)* हळद आणि आले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. यकृत (लिव्हर) आणि मूत्रवहिनी शुध्द राहते.
*५)* तुळस आणि आले दोघेही नैसर्गिक शांततादायक घटक आहेत. मन शांत राहते, झोप चांगली लागते.
*काढा बनवण्याची पध्दत*
# १ ग्लास पाणी उकळा.
# त्यात ५-७ तुळशीची पाने, १ छोटा चमचा हळद, १ चमचा किसलेले आले टाका.
# ५-७ मिनिटे उकळा.
# गाळून गरमच प्यावे. हवे असल्यास मध घालू शकता. गरम काढा थोडा थंड झाल्यावरच.
# रोज एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्यावा.
# या काढ्यात हिवाळ्यात दालचिनी, मिरी सुध्दा घालून त्याची प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकता.
गेट लाईफ लेझर पाइल्स हॉस्पिटल
लाली लॉन समोर, ओल्ड बायपास रोड
अमरावती
9158882450
संकलन : अनिल साखरकर
0 टिप्पण्या