मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/7/2026 :
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने, विविध दिंड्यांमधून पायी चालत भाविक पंढरपूरला पोहोचले आहेत. प्रत्यक्ष मंदिरात जाता आले नाही, तरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन वारकरी समाधानाने परत फिरतात.
जात-पात, धर्म-पंथ, गरीब-श्रीमंत आणि स्त्री-पुरुष या भेदांच्या पलीकडे जाऊन येथे प्रत्येकात फक्त 'माऊली' पाहिली जाते. कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. एकाच पंगतीत बसून मिळेल ती भाजी-भाकरी प्रसादरूपाने सेवन केली जाते.
ही समरसता आणि हा भक्तिभाव प्रत्येकाच्या मनात कायम राहणे गरजेचे आहे. समोरची व्यक्ती शेवटी एक माणूस आहे, इतकी जरी भावना समाजात राहिली 🌹✍️तरी ही वारी खऱ्या अर्थाने सत्कारणी लागली असे म्हणता येईल.
आजचा संकल्प
पंढरपूरची वारी आपल्याला भरपूर काही शिकवून जाते. वारीतून घेतलेला समतेचा बोध, संतांची शिकवण कायम लक्षात ठेवू व आपल्या आचरणात बदल करू._
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या