विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/06/2026 :
शाळेत आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो. त्यामधून आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव मिळतो व आपला व्यक्तिमत्व विकास होतो.
स्पर्धेसाठी आपण भरपूर तयारी करतो. चुरशीने भाग घेतो. प्रत्येक स्पर्धेत नंबर येईलच असे नसते. जरी नंबर आला नाही तरी इतरांचे कला गुण पहायला मिळतात. त्यातून बरेच शिकता येते.
मुलांनो, यामधूनच आपण घडत जातो. यश-अपयश पचवायला शिकतो. आपल्या पेक्षा गुणवान असणाऱ्यांचे निरीक्षण करून मोकळ्या मनाने त्यांचे कौतुक करण्याचे मनाचे मोठेपण इथेच तयार होते.
शालेय वयातील हे अनुभव म्हणजे आयुष्याची शिदोरी असते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या