विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 13/02/2026 :
समाजातील, तळागाळातील लोकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात व वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागून समाज संस्कारी व शिक्षित व्हावा हा शिक्षणामागील हेतू आहे.
जीवन कसे जगावे हे शिकवणारे शिक्षण जेथे मिळते त्या मंदिरासम पवित्र वातावरण असलेल्या शाळा म्हणजे जीवन शिक्षण विद्या मंदिर अशा शाळांमध्ये संस्कारित झालेली मुले म्हणजे सुशिक्षित
मुलांनो, असे सुशिक्षित होण्यासाठी आपण शाळांमध्ये जातो हे लक्षात घ्या. परीक्षा देऊन गुणवंत होताना जोडीला विचारवंत, नीतीवंत, निष्ठावंत असेही होणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञान घेत असतानाच व्यवहार ज्ञान मिळवण्यासाठी पण प्रयत्नशील रहा.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या