विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/02/2026 :
कोणतीही गोष्ट जेव्हा मुबलक असते तेव्हा तिची किंमत कळत नाही. किंबहुना ती जास्त असते तेव्हा त्या गोष्टीचा त्रास वाटतो, वैताग येतो. नसल्यावर मात्र असाविशी वाटते.
जसे की उन्हाळ्यात जे ऊन नकोसे वाटते त्याची हिवाळ्यात मजा लुटतो. उन्हाळ्यात पाणी हवे असते तर पावसाळ्यात पाऊस बंद होण्याची वाट पाहतो. या झाल्या नैसर्गिक गोष्टी, यांचे नियंत्रण आपल्या हातात नसते, पण...
मुलांनो, ज्या गोष्टी आपण करू शकतो त्याचे तरी योग्य नियोजन करू. प्रदूषण वाढवून जमीन, हवा, पाणी प्रदूषित करणारे व नंतर शुद्ध काहीच नाही म्हणणारे आपणच.
अजूनही शहाणे बनू व नैसर्गिक संपत्ती जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या