*तीन चांगल्या गोष्टी*
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 30/5/2025 :
*तीन चांगल्या गोष्टी* आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या
१) मॅगी यायच्या आत आम्ही *मोठे* झालो.
२) Mobile यायच्या आत आमचे *शिक्षण* झाले.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
३) Whatsapp यायच्या आत आमचे *लग्न* झाले.
आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं
ABCD .......XYZ याचा संबंध *फक्त शाळेत* गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !
आणि आता
ABP माझा , CID , MRI , X-ray , Blood , Star TV , Z-TV *विचारूच नका .*
आमच्या लहानपणी ,
*This is Gopal. आणि That is Seeta
ही दोन वाक्ये पाचवीत गेल्यावर वाचता यायचे, तरी घरी *जबरदस्त कौतुक* व्हायचं !
आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची.
आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला
*एकदम कंडक्टर*
झाल्या सारखंच वाटायचं !
अहो कंडक्टर याच्यामुळे की .....आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले,
हं sss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार ?
असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं .....
*मी मोठेपणी कंडक्टर* होणार किंवा पोलीस होणार !
तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला *किती परसेंटेज* मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं.
फक्त एवढंच विचारायचे ....
*पहिल्या झटक्यात पास झालास ना ?*
आणि
आपण हो म्हणताच *अख्ख्या गावाला आनंद व्हायचा*
म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना
*किती छोट्या होत्या !*
लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून
*दुःखच होतं .*
तुम्ही बघा पूर्वी ....
*गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी ,*
त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी.उसनंपासनं केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता ,
*तरीही मजा खूप होती!*
तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !
उसनंपासनं करावंच लागायचं ...
*साखर , चायपत्ती , गोडेतेल , कणिक, कोथिंबीर , मिरची*
या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा
*जन्मसिद्ध हक्कच होता.*
त्यामुळे कोणाकडे " हात पसरणे " म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .
उलट या गोष्टींची इतकी सवय होती की
*कोणत्याच गोष्टींचा कधीच" कमीपणा*
वाटत नव्हता !
डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोट उसन मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही .
घरातल्या वडील माणसासाठी १० पैश्याच्या तीन बिड्या किंवा १५ पैशाचा तंबाखूचा पुडा
*आणतानाही मान कशी ताठ असायची !*
कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि
*तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !*
गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती ,
कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,तक्के , उषा, दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्या शिवाय
*" पोरगी दाखवायचा* कार्यक्रम " होऊच शकत नव्हता
आणि मित्र हो हीच
*खरी श्रीमंती* होती , ते आत्ता कळतंय !
आणि
हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं *लग्न होऊन जातं* तरीही कळत नाही
जेव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं ,अरे लग्न झालं वाटतं
हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे.
*भेटत रहा ,*
बोलत रहा ,
*जाणे-येणे ठेवा ,*
विचारपूस करा .....
*जेवलास का ? झोपलास का, सुकलास काही दुखतंय का ?*
.......
असे प्रश्न विचारतांना लागलेला
*मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल स्वरच*
जगण्याचं बळ देत असतो ! माणसा शिवाय ,गाठीभेटी शिवाय , संवादा शिवाय *काही खरं नाही !*🤝🙏
0 टिप्पण्या