*तीन चांगल्या गोष्टी*

*तीन चांगल्या गोष्टी*

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 30/5/2025 : 

*तीन चांगल्या गोष्टी* आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या

१) मॅगी यायच्या आत आम्ही *मोठे* झालो.

२) Mobile यायच्या आत आमचे *शिक्षण* झाले.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे

३) Whatsapp यायच्या आत आमचे *लग्न* झाले.

आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं 

ABCD .......XYZ याचा संबंध *फक्त शाळेत* गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता 

ABP माझा , CID , MRI , X-ray , Blood , Star TV , Z-TV *विचारूच नका .*

आमच्या लहानपणी , 

*This is Gopal. आणि That is Seeta

ही दोन वाक्ये  पाचवीत गेल्यावर वाचता यायचे,  तरी घरी *जबरदस्त कौतुक* व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. 

आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला 

*एकदम कंडक्टर*

 झाल्या सारखंच वाटायचं !

अहो कंडक्टर याच्यामुळे की .....आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले, 

हं sss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार ?

असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं .....

*मी मोठेपणी कंडक्टर* होणार किंवा पोलीस होणार !

तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला *किती परसेंटेज* मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं. 

फक्त एवढंच विचारायचे ....

*पहिल्या झटक्यात पास झालास ना ?*

आणि 

आपण हो म्हणताच *अख्ख्या गावाला आनंद व्हायचा*

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना 

*किती छोट्या होत्या !*

लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून 

*दुःखच होतं .*

तुम्ही बघा पूर्वी ....

*गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी ,*

 त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी.उसनंपासनं केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , 

*तरीही मजा खूप होती!*

तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनंपासनं करावंच लागायचं ...

*साखर , चायपत्ती , गोडेतेल , कणिक, कोथिंबीर , मिरची*

 या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा 

*जन्मसिद्ध हक्कच होता.*

त्यामुळे कोणाकडे " हात पसरणे " म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की 

*कोणत्याच गोष्टींचा कधीच" कमीपणा*

 वाटत नव्हता !

डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोट उसन मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी १० पैश्याच्या तीन बिड्या किंवा १५ पैशाचा  तंबाखूचा पुडा

 *आणतानाही मान कशी ताठ असायची !*

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि

 *तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !*

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती ,

कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,तक्के , उषा, दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्या शिवाय 

*" पोरगी दाखवायचा*  कार्यक्रम " होऊच शकत नव्हता 

आणि मित्र हो हीच 

*खरी श्रीमंती* होती , ते आत्ता कळतंय !

आणि 

हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं *लग्न होऊन जातं* तरीही कळत नाही 

जेव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं ,अरे लग्न झालं वाटतं 

हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे.

*भेटत रहा ,*

बोलत रहा , 

*जाणे-येणे ठेवा ,*

विचारपूस करा .....

*जेवलास का ? झोपलास का, सुकलास काही दुखतंय का ?*

....... 

असे प्रश्न विचारतांना लागलेला

*मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल स्वरच*

 जगण्याचं बळ देत असतो ! माणसा शिवाय ,गाठीभेटी शिवाय , संवादा शिवाय *काही खरं नाही !*🤝🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या