मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 06/06/2026 :
आपले मानसिक आरोग्य जपणे हे पूर्णपणे आपल्या स्वतःच्या हातात असते. आपले मन जर स्थिर असेल, तर आपण वेगवेगळ्या प्रकारची आव्हानात्मक कार्ये सहज करू शकतो; यामुळे आपला आत्मविश्वास देखील नेहमी उत्तम राहतो.
जी व्यक्ती आहे त्या परिस्थितीत आनंदाने समाधानी राहू शकते, कोणालाही नाहक दोष देत नाही, आपल्या अपयशाचे खापर इतरांवर न फोडता स्वतःमधील त्रुटी शोधून काढते आणि कोणत्याही घटनेकडे कायम सकारात्मक दृष्टीने पाहते; खऱ्या अर्थाने त्याच व्यक्तीचे मानसिक आरोग्य संतुलित असते.
अशा व्यक्ती स्वतः मनातून समाधानी असतात आणि आपल्या वागण्यामुळे इतरांचे मानसिक आरोग्य कधीही खराब करत नाहीत. राग, लोभ, मोह, मत्सर यांच्या विळख्यात न अडकता, त्या अतिशय साध्या व सरळ मार्गाने आपले जीवन जगतात. अशा व्यक्तींची ना कोणाशी स्पर्धा असते, ना कोणाबद्दल इर्षा!
आजचा संकल्प
आपल्या वाट्याला आलेले जीवन, कोणालाही दोष न देता आहे तसे आनंदाने स्वीकारूया. मनात नकारात्मक विचारांची संख्या वाढवून स्वतःचे मानसिक आरोग्य दूषित करण्यापेक्षा, सकारात्मक राहून त्यामधून योग्य मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या