विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/03/2026 :
जसजसा काळ बदलतो तशा नव्या गोष्टी येतात. जुन्या गोष्टी मागे पडतात. काही काळाने त्या मोडीत निघतात, भंगार मध्ये जातात. त्याची जागा नवीन गोष्टींनी घेतलेली असते.
मात्र एका गोष्टीत काही बदल नाही. पूर्वी होते तसेच आजही आहे ते म्हणजे कर्माचे फळ. जसे कर्म कराल तसे फळ मिळणारच मग ते चांगले असो वा वाईट.
मुलांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याकडून चुकून जरी चुकीची गोष्ट घडली तरी त्याची शिक्षा मिळणारच. चांगल्या गोष्टी करत रहा, नको असले तरी तुमच्या आयुष्यात चांगले क्षण येत राहणार.
करे बुराई सुख चहे, कैसे पावे कोय। बोया पेड़ बबूल का, तो आम कहाँ से होय ॥
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या