चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात?
संकलन : यशवंत वाघ
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/9/2026 :
भारतीय घरांमध्ये शतकानुशतके तुपासोबत पोळी खाण्याची परंपरा प्रचलित आहे. आजीबाई अनेकदा सांगायच्या की, तुपासोबत पोळी खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि शरीर सशक्त होते. आजही आहारतज्ज्ञ हे मान्य करतात की, योग्य प्रमाणात शुद्ध तुपाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला, तुपासोबत पोळी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
*रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त*
पोळीला तूप लावल्याने तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो म्हणजेच तुपाशिवायच्या पोळीप्रमाणे तूप लावल्याने रक्तातील साखर तितक्या लवकर वाढत नाही. त्यामुळे ज्यांना रक्तातील साखरेच्या चढ-उताराची चिंता आहे, त्यांच्यासाठी तुपाची पोळी हा एक चांगला पर्याय मानला जातो. तथापि, मधुमेहासारखे आधीपासून असलेले आजार असलेल्यांनी आपल्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*पोट आणि पचनासाठी फायदेशीर*
तुपातील आरोग्यदायी फॅट्स पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते आतड्यांना स्निग्ध बनवते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्याशिवाय तुपाने माखलेल्या पोळ्या खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि अस्वास्थ्यकर खारट व गोड पदार्थ खाणे टाळता येते. म्हणूनच जे लोक आपले वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासाठी मर्यादित प्रमाणात पोळ्या खाणे हा एक चांगला पर्याय मानला जातो.
*हाडे आणि सांध्यांसाठी चांगले*
रुपयांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन इ व व्हिटॅमिन डी सारखी पोषक तत्वे असतात, जी हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत. आयुर्वैदानुसार, जे लोक तरुणपणी नियमितपणे तुपाचे सेवन करतात, त्यांना वाढत्या वयानुसार गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. म्हणूनच हिवाळ्यात तूप लावलेल्या पोळ्या खाण्याचा विशेष सल्ला दिला जातो.
*त्वचची चमक आणि ऊर्जा वाढ:*
देशी तुपात ॲंटी ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला आतून पोषण देऊन, तिची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्याव्यतिरिक्त तुपातील शाॅट-चेन आणि मीडियम-चेन फॅटी ॲसिड्स त्वरित ऊर्जा देतात. म्हणून प्राचीन काळी शेतकरी आणि मजूर दिवसभर शक्ती टिकवून ठेवण्यासाठी नाश्त्याला मध्ये तुपाने माखलेल्या पोळ्या खाण्यास प्राधान्य देत असत.
*किती प्रमाणात खाणे योग्य?*
तज्ज्ञांच्या मते, इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे, तूपही माफक प्रमाणात फायदेशीर ठरते. साधारणपणे, प्रत्येक पोळीसाठी एक चमचाभर तूप पुरेसे मानले जाते. जास्त प्रमाणात तुपाचे सेवन केल्याने वजन वाढणे आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा संतुलित प्रमाणात समावेश करणे हा आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो.
संकलन : यशवंत वाघ
************************

0 टिप्पण्या