विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/07/2026 :
शालेय जीवनात सुद्धा आपल्याला काही अडचणी येतात, त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्या बालमनाला न झेपण्यासारख्या समस्या येतात तेव्हा आपण नाराज होतो.
खरे तर समस्या आल्याशिवाय त्या कशा सोडवायच्या, त्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कसे कळणार? भावी आयुष्यात असे प्रसंग आल्यावर गोंधळून न जाता शांत मनाने त्या सोडवण्याचे हे प्रशिक्षणच असते.
मुलांनो, या वयात फक्त शालेय अभ्यास नसतो तर अनेक बरे-वाईट अनुभव येतात. त्यामधून योग्य-अयोग्य शिकायचे असते. निर्णयक्षमता वाढवायची असते. सर्वात महत्वाचे आत्मविश्वास कमवायचा असतो.
कोणतीही समस्या आली तरी त्यावर उपाय असतो. तो शोधून समस्या सोडवणे म्हणजे त्यामध्ये मिळवलेले यश.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या